जय जिजाऊ राजे,
राजे तुम्हाला असे वाटत असेल माझ्याकडे पाहून 21व्या शतकातला हा माणूस हा माझा मावळा हा चेहरा पाडून माझ्याकडे का आला आहे?
राजे होय मी आधुनिक आहे मी 21व्या शतकातला मावळा पण लाज वाटते मला मी विकसित, आधुनिक, पुढारलेला, पुरोगामी सुशिक्षित माणूस आणि तुमचा मावळा म्हणून घ्यायला.
राजे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढा हताश निराश हतबल का झालो आहे?
राजे सोळाव्या शतकामध्ये तुम्ही शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सर्व बाजूंनी दुश्मन असताना ,अनेक संकट आणि बिकट परिस्थिती असताना तुम्ही स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्यकारभार चालवला.
राजे आता तुमच्या नंतर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या नंतरच्या पिढ्यांनी फक्त तुमचे नाव घेणे , तुमच्या पुतळ्यांना हार घालने, तुमचे फोटो लावने, एवढंच नाही तर तुमच्यासारखा लूक ठेवणे एवढंच चालू आहे.
इथे विश्वास केव्हाच पानिपत मध्ये मेला. नीतिमत्ता केव्हाच मलीन गंगेमध्ये वाहून गेली. आपुलकी माया जिव्हाळा हवेत जाऊन ढगात विरळून केव्हाच गेल्यात.
शौर्य ,जिद्द, चिकाटी आत्मविश्वास कुठे हरवून गेलेत ते कळत नाही.
राजे इथे फक्त अनिती नांदते आहे. भ्रष्टाचार माजला आहे, स्वार्थाने बरबटलेले लोक स्वतःच्या पोटच्या लेकीचाही गळा घोटत आहे. पैशासाठी इथे आपल्या आज लोकांना दिवसा लुटले जाते तेव्हा आठवते राजे तुम्ही रयतेसाठी, स्वराज्यासाठी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर सात-सात वेळा सुरत लुटलेली. राजे तुमचे कष्ट रात्रंदिवस स्वराज्यासाठी झुंजून, झगडणं आणि जीव लावण आज माती मोल ठरल आहे. आग्र्यावरून पेटार्यातून केलेली तुम्ही सुटका, पन्हाळगडावरून विशाळगडाकडे रात्रीच्या पावसाच्या वेळी तुम्ही मावळ्यांसह सुटका केली,
एवढा मोठा संकट असताना देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी सैतानी वृत्तीचा कोथळा तुम्ही बाहेर काढलात.
इथले राज्यकर्ते फुकटच राशन देतात हो ,तुम्ही जेवढे शेतकऱ्यांना आणि निसर्गाला जपत होते तेवढे जपत नाहीत पण राजे स्वतःच्या संपत्ती प्रॉपर्टी वाढवण्यात व्यस्त असतात आणि जपतात स्वतःला. नीतिमत्ता, माणुसकी, पाप पुण्य, कर्तव्य असले काही प्रकार आता ऐकायला देखील मिळत नाही. राजे इथे माणसालाच माणसाची भीती वाटत आहे. इथे आपल्या आज पोराची भीती आपल्या बापाला आणि माईला वाटत आहे. राजे हे तुमच्या काळातल्या समस्या संकट खूप मोठे होते पण आता इथं छोट्या समस्या डोंगराएवढ्या वाटत आहे आणि त्या सोडवण्यातच तुमचा प्रत्येक मावळा प्राण सोडत आहे पण समस्या काही सुटत नाहीत.
राजे इथे पोरांना पोरी भेटत नाहीत, इथल्या पोरांना हाताला काम भेटत नाही, राजे इथल्या शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मिळत नाही, आलेल्या पावसावर जे पीक येतं त्याला भाव मिळत नाही, तुमच्या काळामध्ये पोर्तुगीज इंग्रज डज फ्रेंच तुम्हाला वाकून मुजरा करायचे आणि आयात निर्यात करून आपल्या शेतमालाला चांगला भाव द्यायचे पण राजे इथली राज्यकर्ते दलाल बनले आहेत आणि मध्येच कमिशन खाऊन भ्रष्टाचारात बरबटले आहेत.
राजे आता राजे शाही राहिली नाही आता लोकशाही आली आहे पण बरं झालं राजेशाही नाही कारण तुमच्यासारखी राजे राहिले नाही आणि लोक सुद्धा. म्हणूनच लोकशाही सुद्धा राहणार नाही.
राजे तुम्ही स्वतः तीनशे साडेतीनशे किल्ले बांधले, काही समुद्रा त बेटावर तर काही घाटमाथ्यावर त्यामधील तुमची राजधानी असलेला एकच किल्ला रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी अन आज संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई यांची तुलना केली तर राजे आजही आपणच सरस ठरत आहात.
आज मुंबई मधली कुठलीही बाजारपेठ रायगड किल्ल्यावरच्या बाजारपेठेसारखी नाही, आज आमचं संपूर्ण आयुष्य टू बीएचके फोर बीएचके वरून वन बीएचके आणि वन आर के वर येऊन ठेपला आहे, राजे रायगड किल्ल्यावरती सहा राण्यांसाठी प्रत्येक वन बीएचके महल विथ टॉयलेट बाथरूम अटॅच तुम्ही सोळाव्या शतकात केल. इथं आम्हाला एका बायकोसाठी एक स्वतःची खोली बांधताना नाकी नऊ येत आहे. हम दो हमारे दो सरकारने नारा दिला असला तरीही त्यांचं पालन पोषण करणे आणि त्यांचे शिक्षण आरोग्य हे चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीत. राजे आम्ही आधुनिक काळात असून सुद्धा आमच्या लेकरांना धड इंग्रजी येत नाही तुमच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी राजेंना आठ भाषा तसेच अनेक विद्या तुम्ही शिकवल्या, 128 युद्ध करून देखील एकही लढाई न हरलेला तुमचा पुत्र तुम्ही घडवलात पण आमचा आधुनिक युगातील मुलगा आणि मुलगी सर्व जग त्याच्या हातात असताना त्याला कोणतीच भाषा आणि कोणतीच विद्या कोणती कला आणि कौशल्य पूर्ण पारंगत करता येत नाही हे सत्य आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी संस्कृत सारख्या भाषेतून दोन ग्रंथ लिहिले राजे आमचे लेकर वाचन सुद्धा करत नाहीत हो.
लढाया युद्ध काय हल्ली त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाही. सर्वजण खूप बिझी झाले आहेत.
राजे तुम्ही तुमचं बालपण तरुण पण जे जगलात तसं जीवन आता नाही.
आज माझी हे मित्र माझी सवंगडी आम्ही इथे जमलो आहोत.तेव्हा तुमचे खेळ ,तुमचे युद्ध सर्व गोष्टी आठवल्या, मा जिजाऊ साहेब यांचा संघर्ष त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, ते स्वप्न छत्रपती संभाजी राजे यांनी लिलया पेललं. आता आमची आई स्वप्न पाहत नाही आम्हीही पाहत नाही आणि आमच्या पुढील पिढीला तर स्वप्न काय असते? ऊर्जा काय असते प्रेरणा काय असते? स्वराज्य काय असते? हे कसे सांगणार?