असमाधानी माणसेच जीवनात यशस्वी होतात.
"खरच माणूस हा कधीच समाधानी राहत नाही." " हेच तर माणूस असण्याचे वैशिष्ट्य आहे." जे आहे त्याचा उपयोग नाही करणार पण एक जरी त्याच्याकडे कमी असेल तर त्यासाठी रडत बसणार,असमाधानी राहणार. होय आपण जे अनुभवले, ऐकले आणि पाहिले बहुतांशी असेच आहे. आपल्या आजूबाजूला कितीही श्रीमंत व्यक्ती आपण पाहिला तर तो कशाची ना कशाची तरी चिंता करत असतो. त्याच्या तुलनेमध्ये एखादा कष्टकरी गरीब शेतकरी बघितला तर तो दुःखी दिसत नाही जरी त्याच्याकडे अनेक संकट अनेक समस्या अनेक कमी असतील तरीही. अर्थशास्त्राचा नियम आहे, जो व्यक्ती जास्त पैसा खर्च करतो तोच व्यक्ती जास्त पैसा कमवतो. माणूस हा बहुतांश वेळा दुसऱ्याकडे बघून जगतो, दुसऱ्याकडे बघून निर्णय घेतो, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. 21 व्या शतकातील माणूस सोळाव्या शतकातील माणसापेक्षा विचाराने निश्चित भिन्न आहे. त्याचे कारण असे आहे की सोळाव्या शतकातील माणसाच्या भोवती ज्या गोष्टी म्हणजे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक परिस्थिती होती तशी परिस्थिती आज नाही. माणसाच्या त्या वेळीच्या गरजा आणि आत्ताच्या गर